Home Breaking News जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी निदर्शने आंदोलन

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी निदर्शने आंदोलन

8

NEET नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी दिल्ली येथील जंतरमंतर वर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी चंद्रपुरात आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी , सामाजिक , धार्मिक राजकीय संघटनाच्या वतीने आंदोलन करण्यात आले . NEET नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची चौकषीची मागणी तथा याला जबाबदार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या प्रमुख मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर कॉकरोच जनता पक्षाचे वतीने ६ जून पासूनआंदोलन उभारण्यात आले आहे . .या आंदोलनात प्रसिद्ध पर्यावरणवादी , वैज्ञानिक सोनम वांगचुक यांच्या सह २० विद्यार्थी २२ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले . मात्र काल सोनम वांगचुक यांना सरकारने बळजबरीने दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटल मध्ये अमानवीय पद्धतीने दाखल केले ..या घटनेचा निषेध देशभरात करण्यात येत आहे . त्या पार्श्वभूमिवर येथील विद्यार्थी व सामाजिक संघटनांमार्फत आज जिल्हाधिकारी कार्यालयात समोर ‘लक्षवेधी निदर्शने आंदोलन ‘ करण्यात आले . यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहरातील अनेक संघटनांचे प्रतिनिधी विद्यार्थी यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला तथा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा व सोनम वांगचुक यांना ससन्मान आंदोलनात परत पाठवावे अशा आशयाची मागणी केली . यावेळी देशाचे राष्ट्रपती महोदया यांना मा जिल्हाधिकारी , चंद्रपूर यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले . या निवेदनात NEET नीट परीक्षेत्रील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी . विद्यार्थ्यांवरील अन्यायकारक धोरणे मागे घेऊन शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करावी आदींचा समावेश आहे . निवेदनावर विविध संघटनांचे प्रतिनिधींनी स्वाक्षरी केली यात किशोर पोतनवार , रिपब्लिकन पक्षाचे प्रवीण ऊर्फ बाळु खोबागाडे , सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे बळीराज धोटे , नगरसेवक नंदु नागरकर , काँग्रेसचे प्रवीण पळवेकर , सुरेश नारनवरे, सचिन राजुरकर , किशोर तेलतुंबडे ,डॉ. गावतुरे , कृष्णा मसराम , सुर्यकांत खनके अँड आर डब्लू. रंगारी ऍड अजीत भडके आदींचा समावेश आहे .

  या आंदोलनात शहरांतील विविध सामाजिक राजकीय संघटनांचे प्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक जिल्ह्यातील हजारों विद्यार्थी तथा आम नागरिक सहभागी झाले होते . यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता